(भारतरत्न या सर्वोच्च नागरी बहुमानाने सन्मानित, जगद्विख्यात गायक, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचा अभिप्राय)
!! श्री !!
आदरणीय प.पू. श्री. परमात्मराज महाराज,
नमस्कार.
आपण आवर्जून पाठविलेला
ग्रंथराज "परमाब्धि" मिळाला, धन्यवाद,
इतकी सखोल आणि व्यापक
संस्कृत अक्षरसंपदा आपण निर्मिली
हासुद्धा चमत्कारच !
- देवकृपेने आमच्या कलाक्षेत्रात,
उच्चतम कलानिर्मिती हाच ध्यास असतो.
व्यावाहारिक, लौकिक भेदाभेद लोप पावतात.
विशुद्ध प्रेम, आंनद, भक्ती व साधना
यातूनच कला परिणाम साधते.
- सुखी व समाधानी समाजाच्या व्याख्येत तिरस्कार व निर्हेतुक संघर्ष यांना स्थान नाही.
- आपले विचार आम्हा सर्वांसाठी निश्चितच
उपयोगी व स्मरणीय आहेत.
- आपल्या कार्यासाठी माझ्या प्रार्थना
व शुभेच्छा.
भीमसेन जोशी.
५ मार्च २००९
पुणे
(महाराष्ट्रा़चे मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद व लोकसभाध्यक्षपद ज्यांनी पूर्वी भूषविले आहे त्या मा.खासदार श्री. मनोहर जोशी यांचा अभिप्रायात्मक शुभसंदेश)
आपला ‘परमाब्धि’ हा ग्रंथ वाचनीय, मार्गदर्शक आणि उद्बोधक असाच आहे. सध्याच्या कठीण काळांत परमाब्धि सारख्या ग्रंथाची नक्कीच आवश्यकता आहे. आपण अतिशय मेहनत घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी हा ग्रंथ प्रकाशित करुन फार मोठी कामगिरी केली आहे. समाजातील विविध वर्गांमध्ये परस्पर सौहार्दपूर्ण भावना निर्मितीसाठी परामाब्धि ग्रंथाची निश्चितच आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्या या ग्रंथाचा प्रचार व प्रसार होणे जरुरीचे आहे, असे माझे ठाम मत आहे. ‘परमाब्धि’ सारख्या एका महान ग्रंथाची निर्मिती केल्याबद्दल मी आपले मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.
खासदार मनोहर जोशी
(राज्य सभा)
महापौर-मुंबई १९७६ -७७
विरोधी पक्ष नेता १९९० -९१
मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य १९९५ -९९
मंत्री - भारत सरकार १९९९ -२००२
अध्यक्ष - लोकसभा २००२ - २००४
दिनांक : १५ मे, २००९
(महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान. छगन भुजबळ यांचा अभिप्रायात्मक शुभेच्छा संदेश)
परमपूज्य परामात्मराज महाराजांनी लिहिलेला ‘परमाब्धि’ हा सर्वांगसुंदर ग्रंथ पाहिला. या ग्रंथास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
परामात्मराज महाराजांनी परमाब्धि या आपल्या ग्रंथात मानवांना एकाच परमदिव्य आध्यात्मिक छत्राखाली एकत्र येण्याचे आवाहान केले आहे. त्यामुळे परमाब्धि हा ग्रंथ जगातील सर्व विचारधारांना आणि सर्व मानव जातीला स्वत:मध्ये सामावून घेणारा एक महासागर ठरेल, असा मला विश्वास आहे. या ग्रंथाच्या निर्मितीमुळे ज्ञानारसाचा लाभ सदा सर्वकाळ सर्व मानवांना घेता येणार आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी आणि भल्या़साठी या ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल.
परमपूज्य परमात्मराज महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ सर्वदूर पोहोचावा व समाजाच्या भल्यासाठी त्याचा उपयोग व्हावा या सदिच्छा !
परमाब्धिकार
प. पू. परमात्मराज महाराज,
श्री दत्त देवस्थान आडी,
ता. चिक्कोडी, जि. बेळगांव
उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
दिनांक: ७ जुलै, २००९
(महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद भूषविणारे मान. श्री. बाबासाहेब कुपेकर यांचा अभिप्रायात्मक शुभसंदेश)
परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी रचना केलेला ‘परमाब्धि’ हा ग्रंथराज सर्व समावेशक ग्रंथ आहे. ‘परमाब्धि’ हा ग्रंथ करुणेचा सागर आहे. हा ग्रंथ दयेचा सागर असुन ज्ञानसिंधू आहे.
आजच्या धावपळीच्या युगात मानव सुख शोधत आहे. ‘परमाब्धि’ या ग्रंथाच्या रुपाने मानवाला सुखी जीवनाचा महामार्ग सापडला आहे. या अंधकारमय जीवनातील अंधकार दूर करुन प्रकाश देण्याचे महान कार्य ‘परमाब्धि’ हा ग्रंथ करतो.
जगातील अनेकानेक ग्रंथांना अपेक्षित असणारा ‘वैश्विकधर्म’ या ग्रंथात मांडला आहे. जगातील ग्रंथांना रत्नाची उपमा दिल्यास ‘परमाब्धि’ हा ग्रंथ कोहीनूर हिराच आहे. विश्वात अनेक जातीधर्म पंथ संप्रादय आहेत. या सर्व जाती धर्मांना, पंथांना, संप्रादायांना सामावून घेणारा एकमेव ‘परमाब्धि’ हा ग्रंथ वाटतो.
या ग्रंथराजाचा सर्वत्र प्रसार होणे आवश्यक आहे. या ग्रंथाच्या प्रसारासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या ग्रंथाचा प्रचार कार्यास माझ्या मन:पुर्वक शुभेच्छा !
आपला,
(बाबासाहेब कुपेकर)
अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा
सारंग- ६, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग
मुंबई ४०० ०२१.
ऑफिस : २२०२ ३१०१ / २२०२ ३५४२
फॅक्स : २२०२ ४३२०
निवास : २२८२ ९७६० / २२८२ ९७६१
दिनांक: १२।७।२००९
ज्यांनी पूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषविले आहे व सध्या जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव म्हणून कार्यरत आहेत,त्या.मान.खास.श्री.गोपीनाथ मुंडे यांचा अभिप्रायात्मक शुभेच्छा संदेश
शुभेच्छा संदेश
विशुद्ध जीवन जगण्याचे जर कोणी शिकवित असेल तर तो म्हणजे परमाब्धि ग्रंथ होय.जगातील सर्व धर्मांचा दिव्य अर्क परामब्धि मध्ये आहे.म्हणूनच हा सर्वोत्तम दिव्य महासागर आहे.जगातील सर्व धर्म हे एका विश्व धर्माचीच अनेक रुपे आहेत,हे आपल्याला परमाब्धि वाचनानंतर कळते.परमाब्धिमध्ये परमात्मराजांनी सर्व धर्माचे एका विश्व धर्मांचे ऎक्य साधले आहे.
जी व्यक्ती परमाब्धिचे वाचन करील तीच व्यक्ती हा भवसागर तरेल,असे मला वाटते.परमाब्धि ह्या विश्व धर्म ग्रंथाच सर्वत्र प्रसार व्हावा.आपल्या पुढील भव्य दिव्य कार्यास माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
आपला
(गोपीनाथ मुंडे)
संसद सदस्य व राष्ट्रीय महासचिव
भारतीय जनता पार्टी
दिनांकः-१८/०६/२००९
महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.नाम.जयंत पाटील यांचा अभिप्रायात्मक शुभसंदेश
प.पू.परमात्मराज महाराजांनी लिहिलेला ’परमाब्धिः’ हा ग्रंथ सम्पूर्ण मानवजातीचे कल्याण साधणारा ग्रंथ आहे.धर्माधर्मातील संघर्ष थांबावा,त्यांच्यात मतैक्य व्हावे,यासाठी हा ग्रंथ आहे.वैश्वीकधर्म विश्वाला कळावा म्हणून हा ग्रंथ आहे.सर्वसम्प्रदायांमध्ये समन्वय साधणारा हा ग्रंथ आहे.
विश्वव्यापक धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी हा ग्रंथ आहे.परमाब्धि ग्रंथाचा प्रसार होणे अतिशय महत्त्वाचे आहे.सर्वांनी ’परमाब्धिः’ ग्रंथाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले पाहिजेत.परमाब्धि ग्रंथाच्या प्रसारासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.
आपला
जयंत पाटील
>गृहमंत्री
महाराष्ट्र शासन
मंत्रालय मुंबई ४०००३२
टेलीफॅक्स-(०२२)२२०२५०५१/२२०२३८५८
कर्नाटक राज्याचेनगरपालिका मंत्री मान.नाम.श्री.भालचंद्र ल.जारकीहोळी यांचा अभिप्रायात्मक शुभसंदेश
आराध्य श्री गुरुदेवदत्त व दत्तस्वरुप परमात्मराज महाराजांचा आनंत कोटी प्रणाम-या पुण्यक्षेत्रातील या महाराजांच्या पवित्र चरण कमलांना अनंत अनंत शतकोटी प्रणाम.
परमात्मराज महाराजांचे दिव्यदर्शन व अनुभव स्वानुभव नावाच्या ग्रंथामध्ये आहे.असंख्य धर्मग्रंथांचा सार म्हणजे परमाब्धिः, सर्वधर्मग्रंथाचा सार म्हणजे परमाब्धिः
धर्मनिरपेक्षांना व धर्मप्रिय लोकांनाही हा परमाब्धिः ग्रंथ हितकारी आहे. सर्वांचेच हित करणारा हा ग्रंथ आहे.मनःपरिवर्तन करणारी शक्ती या परमाब्धि ग्रंथामध्ये आहे.परमाब्धिः या शब्दाचा अर्थपण आम्ही समजून घेतला पाहिजे. या ग्रंथरुप महासागरामध्ये पृथ्वीवरील सर्व धर्मग्रंथाचा समावेश आहे.
आत्मसाक्षात्कार करुन घेऊन मुक्त व्हायला महान साहाय्य करणारा ग्रंथ म्हणजे परमाब्धि ग्रंथ.या श्रेष्ट ज्ञानसागरातील ज्ञान केवढे पाहिजे तेवढे घेवू शकतो.
परमात्मराज महाराजांकडून ही परमाब्धि रुपी विद्या आमच्या हृदयरुपी गुहेमध्ये स्वीकारली पाहिजे.ही राज विद्या आहे.
श्री परमपूज्य परमात्मराज महाराजांनी लिहिलेल्या या आध्यात्मिक ग्रंथांचा प्रसार कार्याला व पूज्य महाराजांच्या आध्यात्मिक शुभ कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
आपला
भालचंद्र ल.जारकीहोळी
महाराष्ट्राचे पशुसंवर्धन,दुग्धविकास राज्यमंत्री मा.नाम.श्री.हसनसो मुश्रीफ यांचा अभिप्राय
दैनंदिक जीवनात संघर्षमय झाल्यामुळे मानवी मनावरील ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहेत.अशा वेळी मनःशांतीसाठी त्याला अध्यात्माची गरज आहे.प.पू.परमात्मराज महाराज यांच्या परमाब्धिः ग्रंथासारख्या ग्रंथाची आज समाजाला गरज भासत आहे.
सध्याचे युग चंगळवादी बनत आहे.पिढी व्यसनाधीन बनत आहे.माणूस आपलेपण विसरत चालला आहे.त्यामूळे दिवसेंदिवस मानवी मन अधिकच दुभगंत आहे.वाढत्या विवंचनांमुळे मनःशांती नसल्याने समाज भरकटत चालला आहे.अशा समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी अध्यात्माची नितांत गरज भासत आहे.
प.पू.परमात्मराज यांनी आडी डोंगराच्या निसर्गरमय वातावरणात श्री दत्त गुरुचे मूळ देवस्थान उर्जीत अवस्थेत आणले.ते आज भाविकांचे श्रद्धा स्थान बनते आहे.शांत,संयमी, निगर्वी व कोणत्याही प्रकारची अभिलाषा न बाळगता अत्यंत प्रभावीपणे अध्यात्माचा प्रसार अखंडपणे चालू ठेवणार्या परमात्मराज महाराजांच्या परमाब्धिः ग्रंथाने अनेक भाविकांच्या जीवनात आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या ग्रंथात मानवी जीवनात धर्माचे स्थान सर्वोच्च आहे.धर्मामुळे व्यक्तिला ओळख व उच्चविचार धारा मिळते.त्यामुळे धर्माचे महत्त्व मानवासाठी अनन्य साधाराण आहे.मात्र हे विसरुन धर्माचा वापर मानव स्वार्थी पद्धतीने करीत असल्याने मत भेदांची दरी वाढत आहे.
धर्म म्हणजे काय? आणि सर्वधर्मात मानवतावाद असल्याचे त्यांनी य ग्रंथाच्या माध्यमातून सांगितले आहे.याचबरोबर सदाचार,गुरुचे महत्त्व ,भक्ति परंपरा,प्रेषित परंपरा,विद्याग्रहण शासनव्यवस्था,सहकार,शिक्षण,आदि मानवी समाजाशी निगडीत असलेल्या बाबींवर महाराजांनी प्रकाश टाकला आहे. लोकांनी पुरातन ग्रंथांचा वाटेल तसा आधार घेवून वादविवाद करु नयेत,नाहक द्वेष वाढतील असे विचार मांडू नयेत अशा प्रकारच्या भावना महाराजांनी या ग्रंथात व्यक्त केल्या आहेत.एकूणच हा ग्रंथ मानवी जीवनाला शांती देणारा व भरकटलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणणारा असा आहे.महाराजांचे संस्कृत व मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे.व सर्व धर्मांचा त्यांचा गाढा अभ्यास असल्याचे ग्रंथ वाचताना पदोप्दी जाणवते.
प.पू.परमात्मराज महाराज यांच्या दि.२०।५।२००९ रोजीच्या वाढदिवसास कागल तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कागल तालुक्याचा तमाम जनतेचेवतीने व मुश्रीफ परिवाराचेवतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा.(दि.२०।५।२००९)
आपला
हसन मुश्रीफ