जागेपणी देखील परमात्मराज महाराजांच्या सान्निध्यात आमच्या सारख्या भक्तांना राहायला मिळते,त्यांची सेवा करायला मिळते,हे आमचे भाग्यच आहे,पूर्वजन्मीचे पुण्य आहे.त्यांचा असाच सहवास आम्हाला लाभावा.त्यांच्या सभेत बसायला मिळावे,अशी आमची इच्छा आहे.
आम्ही मेल्यावरही आम्हाला परमात्मराज महाराजांच्या सान्निध्यात राहायला मिळावे,त्यांच्या सभेत वावरायला मिळावे,अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
श्री बाबासाहेब मल्लू कोण्डेकर
आडी
प.पू.श्रीगुरु परमात्मराज महाराज यांच्या विषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.
साक्षात भगवंतच मानववेष धारण करुन परमात्मराज नावाने संजीवन पर्वतावर राहत आहे.त्यांचे मी बर्याच वर्षापासून नामस्मरण करीत असतो.महाराजांचे नाव घेत राहिल्याने मला बँके त नोकरी लागली,लग्नही झाले व संततीही झाली.मी महाराजांचे सतत नामस्मरण करीत राहतो.माझी पत्नी देखील सकाळी,सायंकाळी महाराजांचे नामस्मरण केल्याशिवाय व प्रतिमेचे दर्शन घेतल्याशिवाय तोंडात पाणी सुद्धा घेत नाही.त्यांच्या नामाचे स्मरण करीत राहिल्याने छोटया मोठया संकटातून सुटका होते.ते दत्तात्रेय अवतारी आहेत.
परमात्मराज महाराज म्हणजे चैतन्याची मूर्ती,त्यांचे शान्त,तेजस्वी रुप पाहून आपण स्वतःला विसरुन जातो.त्यांच्या सारखी दुसरी व्यक्ती आम्ही अजूनपर्यन्त कुठेही पाहिली नाही व पाहणार नाही.
एकदा मला नोकरीत खूपच त्रास होत होता.दगदग वाढली होती.त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो.त्यामुळे त्यावेळी महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाराजांना परिस्थिती सांगितली.त्यावर महाराज म्हणाले.त्रास करुअन घेऊ नका.गडबड करु नका.थोडे दिवस थांबा,महाराजांच्या सांगण्याप्रमाणे मी केले.गडबडीत निर्णय घेतला नाही.आणि विशेष म्हणजे सर्वच गोष्टी व्यवस्थित झाल्या.माझी नोकरी सुरळीतपणे झाली.महाराजांनीच ती सुरळीत केली.त्यामुळे घरातील सर्वांचे मानसिक स्वास्थ आता चांगले आहे.सगळ्याच बाजूने घरात समाधान आहे.परमात्मराज महाराज यांचे आमच्यावर अनंतकोटी उपकार आहेत.त्यामुळे आम्ही त्यांचे नामस्मरण करीत राहतो.मी प्रत्येक पौर्णिमेला येऊन महाराजांचे दर्शन घेऊन जातो.
परमात्मराज महाराजांचे दर्शन हेच दत्तदर्शन आहे,विष्णुदर्शन आहे,शिवदर्शन आहे.त्यांच्या दर्शनाने मला भरपूर लाभ झाला आहे. परमात्मराज महाराजांचे अखण्ड दर्शन आम्हाला लाभावे व त्यांचे नामस्मरण सतत घडावे,त्यांच्या कृपादृष्टीचा आम्हाला लाभ व्हावा,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.त्यांनी आमचे जीवन सुखमय केले आहे,त्यांनी आमच्या जीवनाला दिशा दाखविली आहे.
परमात्मराज या महान भगवंताचे नित्यस्मरण आमच्या हृदयात सदैव रहावे.आम्हाला पुनर्जन्म मिळाला तरी हे नित्यस्मरण त्या जन्मीदेखील आमच्या हृदयात सदैव राहावे.श्रीगुरुमाऊली परमात्मराज महाराजांच्या चरणी वंदन करुन मनोगत पुरे करतो.
॥जय परेश सर्वायण॥
श्री.बसगोंडा बापूसाहेब पर्वते
वीरशैव बँक(महाद्वार रोड ब्रँच) कोल्हापूर
मूळ पत्ता-मु.पो.सुळकूड,ता.कागल जि.कोल्हापूर
परमपुज्य परमात्मराज महाराज आडीला आल्यापासून मी त्यांच्या दर्शनासाठी जात असतो.त्यांचे दर्शन झाल्यानंतर माझे पूर्ण आयुष्य बदलून गेले,आर्थिक उन्नती व्हावयास लागली,व्यवसाय जोरात चालू लागला.
महाराजांचे माझ्याकडे पूर्ण लक्ष्य आहे,असा मला अनेकदा अनुभव आला आहे.मी मनामध्ये एखाद्या कामाचा संकल्प केला व त्यानंतत महाराजांच्या कडे जाऊन त्यांचे दर्शन घेतले की त्यांच्या कृपाशीर्वादामुळे माझे आजपर्य्न्त कोणतेही काम तटले नाही
मी व माझे पूर्ण कुटुम्ब महाराजांच्या आशीर्वादाने सुखरुप आहे.आनंदित आहे.एखादे वेळी एखादे संकट आले तरी महाराज ते संकट दूर करतात. परमात्मराज महाराज हे साक्षात परमेश्वर आहेत.ते आमच्या भागात आलेय,हे आमच्या भागाचे भाग्य आहे.
श्री.सिद्धू गुंडू खोत
हणबरवाडी ता.चिकोडी
मी शब्बीर इब्राहिम मुल्ला मांगूर गांवचा रहिवासी आहे.आडी येथील परमात्मराज महाराजांच्या विषयी माझ्या एका मित्राला आलेला अनुभव सांगतो,त्यानंतर महाराजांच्या विषयी भावना व्यक्त करतो.
माझे मित्र श्री.अनंत कुलकर्णी यांना आर्थिक त्रास भरपूर होत होता.त्यांना त्यांचे मांगूर येथील मामा श्री शाम भटजी यांनी आडीला परमात्मराज महाराजांना भेटण्याविषयी सांगितले.ते महाराजांना जाऊन भेटल्यावर महाराजांनी त्यांना एक मंत्र दिला.आणि तो मंत्र म्हणणे त्यांनी सुरु केल्यावर फक्त सहासात दिवसात आश्चर्यच घडले.त्यांच्या ध्यानी मनी नसताना एका वेगळ्या कामाकरिता गेले असताना एका कुन्नुरच्या दलालाने बोलावून सांगितले की’एक गाय आहे घेता का ?’ त्यांनी ती गाय आणली.ती गाय आणल्यापासून त्यांचे चांगले झाले.
मला ते आडीला येण्यास सांगत होते.पण इच्छा असून घडत नव्हते.आणि एके दिवशी खरोखर मला महाराजांनीच बोलावून घेतले.माझे मित्र श्री.अशोक खोत व श्री.शिवाजीराव पाटील(बेनाडी)यांना घेऊन मी महाराजांना भेटण्यास गेलो.त्यांचा आशीर्वाद घेऊन आल्यापासून माझा चांदीचा उद्योग चांगला चालला आहे.आम्ही समाधानी आहोत.
मी महाराजांच्याकडे जाण्यापूर्वी मला असे वाटत होते की,महाराज स्वतःजाऊन भेटल्यानंतर आश्चर्य वाटले आणि सर्व वेगळेच घडले.मी एक मुसलमान असून सुद्धा त्यांनी मला आपुलकीने वागविले.ते माझ्याशी अपेक्षेपेक्षाही जास्त प्रेमाने बोलले व आशीर्वाद दिले.तेंव्हापासून माझे सर्व चांगलेच झाले.महाराजांच्या विषयी जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे.
शब्बीर इब्राहिम मुल्ला
मांगूर
(डायरेक्टर,चांदी औद्योगिक संघ,हुपरी)
परमपूज्य परमात्मराज महाराज हे जगद्गुरु आहेत.त्यांच्या चरणी वंदन करुन त्यांच्या विषयी आलेला अनुभव सांगत आहे.तो अविस्मरणीय आहे.
गोकुळ शिरगावं एम्.आय्,डी.सी.मधील एका कम्पनीमध्ये ८-१० वर्षांपासून इन्जिनिअर म्हणून काम करीत होतो.कम्पनीमधील पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती.सर्व कामगारांना बरोबरच घेऊन मी काम करीत होतो.मिळून मिसळून राहत होतो.परन्तु माझी प्रगती जेमतेमच होती.त्यामुळे मनाला खंत वाटत होती.काही मार्ग सुचत नव्हता.
एकेदिवशी हिरेमठ स्वामींनी मला सांगितले की तुम्ही परमात्मराज महाराजांचे दर्शन घ्या.ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील.त्यामुळे मी आडीला महाराजांना भेटण्यासाठी आलो.त्यांचे दर्शन घेतले व म्हणालो,’नोकरी करुन माझी प्रगती काहीही होत नाही आहे.कम्पनीचा फक्त सर्व फायदा होत आहे.स्वतःचा उद्योग करण्याची इच्छा आहे.परन्तु मी घाबरत आहे.कामगार व्यवस्थित मिळतील की नाही?एवढे मोठे काम माझ्याकडून होईल की नाही?बिल व्यवस्थित मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत.’
यावर परमात्मराज महाराज म्हणाले.’ते काम बिनधास्त करा.आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच .मात्र हिशोबाने रहा.’
परमात्मराज महाराजांच्या आशीर्वादाने व नामजपाने मी नवीन उद्योगाला आरंभ केला.त्यांच्या कृपेने कामही मिळाले,कामगारही भरपूर मिळाले.आता कोठलीही चिंता नाही.सध्या विजापूर व अन्य काही ठिकाणी माझे काम चालू आहे.माझे व्यवसायात व्यवस्थित सेटलमेंट झाले आहे.
परमात्मराज महाराजांनी मला माझ्या पुढीलजीवनाचा मार्ग दाखविला.माझ्या जीवनाची गुरुकिल्ली त्यांनी मला दिली.त्यामुळे ते माझ्या करिता सर्वस्व आहेत.त्यांच्याकृपेने आता चारचाकी गाडीतून फिरत आहे.
माझ्या पत्नीला देखील महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे.महाराजांच्या फोटोचे दर्शन घेतल्या शिवाय ती तोंडात पाणी सुद्धा घेत नाही.एवढी तिची सुद्धा महाराजांवर श्रद्धा आहे. ॥जय परेश सर्वायण॥
श्री.प्रसाद आतिग्रे(D.M.E)
कोल्हापूर